महाराष्ट्रातील प्रमुख आदिवासी जमाती Maharashtratil Aadiwasi jamati

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

आदिवासी जमातीची काही ठळक वैशिष्ट्ये अशा प्रकारे आहेत?

1951 मध्ये भारतात आदिवासी लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा 4था क्रमांक लागतो. महाराष्ट्रात एकुण 47 आदिवासी जमाती अस्तित्वात आहेत. एकेका आदिवासी जमातीची बहुधा स्वतंत्र भाषा वा बोली असते.
Aadivasi jamati maharashtra
महाराष्ट्रातील प्रमुख आदिवासी जमाती

महाराष्ट्रातील प्रमुख आदिवासी जमाती

  • एक एक आदिवासी जमात एका विशिष्ट भूप्रदेशात राहाते व तो भूप्रदेश क्षेत्रफळाच्या दृष्टीने प्रगत समाजाच्या प्रदेशाच्या मानाने लहान असतो. आदिवासी क्षेत्र इतर प्रगत समाजापासून दूर किंवा जंगलात असते. रस्त्यांच्या अभावी तो प्रदेश दुर्गम असतो.
  • आदिवासी जमात साधारणपणे अंतर्विवाही असते व तिचे बहिर्विवाही कुळींत विभाजन झालेले असते. समाजातील गट लहान असतात व ते नातेसंबंधांवर आधारलेले असतात. या गटांचे सदस्यत्व आधुनिक समाजातील मंडळाच्या (क्लब) सदस्यत्वाप्रमाणे ऐच्छिक नसते.
  • प्रत्येक आदिवासी जमातीची स्वतंत्र पंचायत असते. आदिवासी समाजाचे नियंत्रण पूर्णपणे पंचायत किंवा त्यांचा मुखिया करतो.
  • आदिवासींचा धर्म क्षेत्रीय म्हणजे त्यांच्या निवासस्थानापुरता मर्यादित असतो; त्यांची तीर्थक्षेत्रेही त्यांच्या भागातच असतात.

Maharashtratil Aadiwasi jamati baddal mahiti

  • आदिवासी अर्थव्यवस्थेत गटवार श्रमविभाजनाचा वा धंदेवार भिन्न सामाजिक गटांचा अभाव असतो. सर्व लोक सर्व प्रकारची कामे करतात. याशिवाय आदिवासी अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने प्राथमिक स्वरूपाची असतात. पाटावरवंटा, सापळे, जाळी, आकडे, गळ, दोऱ्या, टोकदार व धारदार दांडकी, हातोडा, कोयता ह्यांसारखी प्राथमिक अवजारेच वापरात असतात. अर्थव्यवस्थेतील उत्पादन-वितरण-सेवन या तीन टप्प्यांपैकी वितरण म्हणजे मालाची वा उत्पन्नाची सार्वत्रिक देवघेव, हा टप्पा आदिवासी अर्थव्यवस्थेत नसतो. उत्पादन कमी असल्यामुळे बाजारपेठाही नसतात. जो तो आपापल्या उत्पादनाचा उपभोग घेतो. त्यांची अर्थव्यवस्था बहुधा नाणे इ. चलनावाचून चालणारी व वस्तुविनिमयाधिष्ठित असते. वस्तुविनिमय म्हणजे उपयुक्त वस्तूंची देवघेव.
  • आदिवासी समाजात परंपरेला प्राधान्य असते. परंपरेचा ठेवा एक पिढी दुसऱ्या पिढीस कथा, काव्य, नृत्य इ. माध्यमांद्वारे देते.
  • धर्मात निसर्गपूजेस व जादूसारख्या क्रियाकल्पास महत्त्व असते.
  • आदिवासी समाजात परंपरा व सामाजिक नियंत्रण यांवर भर असल्याने सर्व लोकांच्या वागण्यात सारखेपणा असतो. दैनंदिन व्यवहारातील ठराविक चाकोरीमुळे सवयी व चालीरीती बनतात. एकंदरीत समाजात एकजिनसीपणा जास्त आढळतो.
  • आदिवासी समाज बरेचसे स्वयंकेंद्रित असतात; त्यांचे आर्थिक, सामाजिक व धार्मिक जीवन बाह्यसंपर्कापासून शतकानुशतके अलिप्त राहिल्याने स्वयंकेंद्रितता येणे स्वाभाविक आहे. जगातील सर्व समाज पूर्वी आदिवासी अवस्थेत होते. पुढे ते ग्रामीण समाज झाले. नंतर राज्यसंस्था आल्यानंतर राजधान्या व व्यापारी पेठा झाल्या व त्यामुळे नागरीकरणास प्रारंभ झाला. औद्योगिक क्रांतीनंतर संपूर्ण नागरीकरणाच्या दिशेने मानवी समाज वाटचाल करू लागले आहेत, असे प्रख्यात मानवशास्त्रज्ञ रॉबर्ट रेडफिल्डचे मत आहे. आधुनिक काळात त्यामुळेच निर्जमातीकरणाची प्रक्रिया सुरू होऊन आदिवासी समाजांचे ग्रामीण समाजावस्थेत रूपांतर होऊ लागले आहे.

महाराष्ट्रात आदिवासी जमात कोणत्या विभागात आढळते?

1) सह्याद्री विभाग:
  • नाशिक,रत्नागिरी, रायगड, ठाणे, अहमदनगर, पुणे इ.
  • मल्हार कोळी, ढोर कोळी, महादेव कोळी, वारली, कोकणा, कातकरी, ठाकुर, दुबळा धोडीया इ.
2) सातपुडा विभाग:
  • धुळे, नंदुरबार, जळगांव, अमरावती, नांदेड इ.
  • कोकणा, पावरा, गामीत, गावीत, भिल्ल, कोरकू, धानका, पारधी, नायकडा, राठवा इ.
3) गोंडवन विभाग:
  • चंद्रपुर, यवतमाळ, गडचिरोली, भंडारा, नागपूर इ.
  • गोंड, आंध, कोलाम, परधान, हळबा-हळबी, कावर, थोटी- थोट्या, कोरकू, माडीया, राजगोंड इ.

अकोले तालुक्याचा पश्चिम पट्टा हा डोंगराळ आणि वेगवेगळ्या आदिवासींची वस्ती असलेला शेकडो कदाचित हजारो वर्षापासून या आदिवासी जमाती या पर्वतराजीच्या कुशीत आपले नैसर्गिक जीवन जगत आहेत. गेल्या १०-२० वर्षापासून दळणवळणांच्या साधनांमुळे त्यांच्या नागरी वस्तीशी आणि नागरसमाजाशी संबंध येऊ लागला. त्यामुळे त्यांच्या विचारसरणी, राहणीमान, दृष्टीकोनात बदल दीसू लागला आहे. परंतु अशा परिस्थितीतही मागच्या पीढीतील अनेकांनी तालुक्याचे गाव पाहिलेले नाही. या आदिवासींमध्ये महादेव कोळी या समाजाची वस्ती सर्वात जास्त आहे. गेली अनेक शतके इथला आदिवासी पुर्णत: आदिम जीवन जगत होता. १९७७ साली(कुमशेत येथील) तेव्हाण्चे आदिवासी जीवन यात पुष्कळ बदल झालेला असला तरी त्यांच्या समस्या नागरी समस्यांपेक्षा कितीतरी भयानक आहेत. पावसाळ्यात त्यांच्या हालाला पारावर नसतो. प्रवरा खोर्यातील आदिवासींपेक्षा मुळा खोर्यातील आदिवासी अधिक समस्याग्रस्त आहेत. सरकारी योजना व मिळणार्या अनुदानामुळे त्यांना निवारा, कपडा, रेशन, औषधोपचार, मुलांचे शिक्षण इ. सुविधा मिळू लागल्या आहेत. त्यामुळॆ पुर्वीपेक्षा जीवनस्तर निश्चितच उंचावला आहे. पण ज्या कुंटुबात अजुनही कोणी शिकलेले नाही, त्यांच्या जीवनमानात फारसा फरक नाही.

ब्रिटिशांनी केलेल्या जनगणनेत आदिवासींना विविध नावाने संबोधले जाऊ लागले होते खालीलप्रमाणे.

  1. 1901-  पशुपालक
  2. 1911- पशुदेववादी
  3. 1921- डोंगरी व वन्यजमाती
  4. 1931- आदिम जमाती
  5. 1941- जनजाती
  6. 1935- च्या कायद्याने
  7. 1950च्या संविधानानुसार –  वन्यजमाती(जनजाती)

आदिवासी म्हणजे काय? Aadiwasi mhanje kay

“धरतीला खर्या अर्थाने आपली माता मानणारे हे आदिम जन, आदिवासी, जन्मभर नाचणारी, गाणारी, राकट शरीराची पण निरागस मनाची माणसं, प्रगतीकडे जाणार्या आधुनिक शिक्षणाच्या पहिले पाऊल टाकण्याआधी धार्मिक चालीरीती, मागासलेपणा, आर्थिक दुर्बलता, भुतेखेते व देवदेवतांच्या जंजाळातून बाहेर पडावे की न पडावे या संभ्रमात वेळ घालावणारी माणसं, ही निसर्गपुजक संस्कृतीशी, निसर्गाशी एकरुप झालेली भोळीभाबडी माणसं, गतिहीन व रुढीप्रिय समाज म्हणुन “आदिवासी” असे ओळखले जातात.