राज्यात कोरोनाच्या संकटात पोलिस दलावर मोठा ताण आला आहे. जवळपास दोनशेहून अधिक पोलिस यात मृत्युमुखी पडले आहेत. तसेच अनेक रिक्त जागा असल्याने विद्यमान पोलिसांवरही ताण आला आहे. कोरोनात राज्याच्या महसुलात मोठी घट झाल्याने आहे त्या कर्मचाऱ्यांचा पगार करणे सरकारसाठी अवघड झाले आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या नोकर भरतीवर बंदी घालण्यात आली होती. पोलिस आणि आरोग्य या दोन खात्यांना फक्त त्यासाठी अपवाद करण्यात आला आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्य बैठकीत पोलिस भरती करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले. त्याची सविस्तर माहिती लवकरच जाहीर केली जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात या जागा भरल्या जाणार आहेत. त्यामुळे अनेकांना सध्याच्या कठीण परिस्थितीत रोजगार मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने सर्व प्रकारची भरती पुढे ढकलावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली होती. या भरतीत मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून अर्ज करण्याची मुभा मिळण्याची शक्यता आहे.
Please inform me