पोलीस भरतीला नेहमी विचारले जाणारे प्रश्न? Police Bharti Notes

Police Bharti महाराष्ट्र पोलिस भरतीमध्ये नेहमी प्रत्येक परिक्षेत हे प्रश्न विचारले जातात.

police%2BBharti%2Bmpsc%2Bkida
सरळसेवा भरती : पोलिस भरती , ग्रामसेवक भरती, तलाठी भरती
•  महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर- कळसुबाई (१६४६ मी.) ता. अकोले, जि. अहमदनगर.
•  महाराष्ट्राला ७२० कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.
• महाराष्ट्राची राजधानी – मुंबईउपराजधानी  – नागपूर.
• महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या – ३६.
•  महाराष्ट्राने भारताचा ९.७ टक्के भाग व्यापलेला आहे.
•  महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात राज्य व दादरा-नगर हवेलीच्या सीमारेषा आहे.
•  महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश राज्याची सीमा सर्वात लांब आहे.
• महाराष्ट्रात कोकण प्रदेश उत्तरेकडे डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत आहे. * विदर्भातील तलाव मालगुजारी नावाने ओळखले जातात.
• विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.
• महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी रत्नागिरी जिल्ह्यात चालते.
• महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया आहे, तर शहर ठाणे आहे.
• महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकाने बनलेले आहे.
•  महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणून ओळखतात.
• महाराष्ट्रातील मुंबई जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे
• महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.

Police Bharti Notes

• महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे.
• महाराष्ट्रातील १०० टक्के साक्षर जिल्हा- सिंधुदुर्ग, तालुका पन्हाळा.
•  महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा- वर्धा.
•  महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जिल्हा नगर.
•  भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या महाराष्ट्रात आहे.
• भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती महाराष्ट्रात होते.
•  महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना नाशिक येथे आहे.
• महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा अहमदनगर.
• भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड जिल्ह्यात आहे.
•  महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस आंबोली (सिंधुदुर्ग) येथे पडतो.
पंढरपूर शहर भीमा नदीकाठी आहे. महाराष्ट्राची काशी म्हणतात.
गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात.
•  प्रवरा नदीच्या खोऱ्यात उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते.
गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात वज्रेश्वरी येथे आहेत.
•  जगप्रसिद्ध लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे.
•  औरंगाबाद शहर बावन्न दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते.
•  पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहर बटाटय़ाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे.
•  महाराष्ट्रातील जायकवाडी प्रकल्पाला नाथसागर म्हणतात.
°  कोयना प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते म्हणून महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी असे म्हणतात.
•  कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर म्हणतात.
विदर्भातील नंदनवन असे चिखलदरा थंड हवेच्या ठिकाणाला म्हणतात.
•  विदर्भातील कॅलिफोर्नियाचा असे वरुड चांदूरबाजार तालुक्याला म्हणतात. कारण तेथे जास्तीत जास्त संत्रा पिकविला जातो.

Maharashtra Police Bharti Tayari

•  महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ अमरावती येथे आहे.
•  विदर्भातील प्रसिद्ध आनंद सागर शेगाव येथे आहे.
•  संत गजानन महाराजांची समाधी शेगाव जि. बुलढाणा येथे आहे.
संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे आहे.
• राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी मोझरी, जि. अमरावती येथे आहे.
•  संत गाडगेबाबांची समाधी अमरावती येथे आहे.
•  ब्रह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा रत्नागिरी येथे आहे.
•  यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे आहे.
•  महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे आहे.
•  महाराष्ट्र राज्यात तोफखाना प्रशिक्षण शाळा देवळाली, जि. नाशिक.
पुणे ही पेशव्यांची राजधानी आहे.
•  कोल्हापूर येथे देशातील गुळाची बाजारपेठ आहे.
•  आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म शिरढोण, जि. रायगड येथे झाला.
• मुंबई शहराला भारताचे पॅरिस असे म्हणतात
•  यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळास प्रीतीसंगम असे म्हणतात.
•  महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक येथे आहे.
•  नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला येथे आहे.
•  महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम व विनोबा भावेंचा पवनार आश्रम वर्धा जिल्ह्यात आहे.
•  शिखांची दक्षिण काशी म्हणून नांदेड शहर प्रसिद्धी आहे.
•  महाराष्ट्रात नाशिक येथे कुंभमेळा भरतो.
•  शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी येथे आहे.
•  ज्ञानेश्वरांनी नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली.
तारापूर हे भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र आहे.
• भारतातील पहिला पेट्रो रसायन प्रकल्प तुर्भे या ठिकाणी आहे.
•  महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा ठाणे.
• रायगड जिल्ह्यात- कातकरी, ठाणे जिल्ह्यात- वारली, यवतमाळ जिल्ह्यात- कोलाम या आदिवासी जमाती प्रामुख्याने आढळतात.