ग्लोबल वार्मिंग म्हणजे काय ?

ग्लोबल वॉर्मिंग किंवा जागतिक तामपानवाढीचे दृश्य परिणाम आता दिसू लागले आहेत. त्या परिणामांमागे नेमकं आहे तरी काय याचा सांगोपांग आढावा. सोबत, पर्यावरणविषयक कामाबद्दल यंदा नोबेल पारितोषिक मिळविणारे अल गोर यांच्या कार्याचा आढावा…
गेली काही वषेर् दर उन्हाळ्यात तापमानाचे आकडे वृत्तपत्रे छापतात. दूरचित्रवाणीवर सुमारे ३५ सेकंद एखादा तज्ज्ञ त्याबद्दल काहीतरी मत व्यक्त करतो. त्याला मध्येच तोडून जाहिराती सुरू होतात आणि मग दूरचित्रवाणी निवेदक जागतिक तापमानवाढीचा हा परिणाम असल्याचं सांगतो. मंुबईत किंवा राजस्थानात धुंवाधार पाऊस पडतो, लगेच त्याचा संबंध जागतिक तापमानवाढीशी जोडला जातो. न्यू अॅलिर्अन्स सागरी वावटळीने आलेल्या प्रलयात बुडतं. अमरनाथला शिवलिंग तयार होत नाही, हिमालयातील बर्फ वितळून ३०-४० वर्षांपूवीर् हरवलेल्या गिर्यारोहकांचे मृतदेह सापडतात. त्याचा संबंधही जागतिक तापमान वाढीशी जोडला जातो. पूवीर् भारतात काहीही घडलं की, त्यात परकीय शक्तींचा हात आहे असं जाहीर केलं जायचं. तसंच आजकाल जगातल्या कुठल्याही नैसगिर्क आपत्तीचा संबंध जागतिक तापमानवाढीशी जोडला जातो.
जागतिक तापमानवाढ किंवा ‘ग्लोबल वॉमिर्ंग’ म्हणजे नक्की काय आहे? दरवषीर् उन्हाळ्यात तापमान वाढतं आणि हिवाळ्यात ते कमी होतं. या प्रकाराला ग्लोबल वॉमिर्ंग किंवा ग्लोबल कूलिंग का म्हणत नाहीत? याचं उत्तर देताना पृथ्वीचा आस २३.५ अंश कललेला असल्यामुळं ऋतू कसे होतात, हे शालेय ज्ञान सर्व वाचकांना आहे, हे आपण गृहीत धरूया. या प्रकारे दरवषीर्च उन्हाळा आणि हिवाळा हे ऋतू होतात. (आपल्याकडे आणि बऱ्याच पूर्व आशियाई देशांत पावसाचा वेगळा ऋतू असतो. प्रत्यक्षात तो उन्हाळ्याचा आणि पानगळीच्या ऋतूचा भाग असतो.) आपल्याकडे जेव्हा उन्हाळा असतो, तेव्हा दक्षिण गोलार्धात हिवाळा असतो आणि आपल्याकडे हिवाळा असतो, तेव्हा दक्षिण गोलार्धात उन्हाळा असतो.
जेव्हा पृथ्वीचं सरासरी तापमान वाढतंय असं म्हटलं जातं, तेव्हा भूपृष्ठावरील वातावरणीय तापमानाबद्दल आपण बोलत असतो. सामान्यपणे पृथ्वीवरील उन्हाळी सरासरी तापमानाचा आकडा पूवीर्च्या वषीर्च्या सरासरी तापमानापेक्षा जास्त असतो आणि हिवाळ्यातील सरासरी तापमानामध्ये वाढ होऊन तोही आकडा वाढलेला असतो. म्हणजे स्वेटर कमी दिवस वापरावे लागलेले असतात, तेव्हाच पृथ्वीचं त्या वषीर्चं सरासरी तापमान पूवीर्पेक्षा जास्त होतं असं म्हटलं जातं.
काही वर्षांपूवीर् जेव्हा प्रथम पृथ्वीचं सरासरी तापमान वाढतंय असं म्हटलं गेलं, तेव्हा तिकडे कुणी फारसं लक्ष दिलं नव्हतं. ओझोनथर विसविशीत झालाय किंवा ओझोनथराला छिद पडलंय असं म्हटलं गेलं, तेव्हाही तिकडे कुणी लक्ष दिलं नव्हतं. गेली काही वर्षं डिसेंबर-जानेवारीतल्या बातम्या बघितल्या, तर सरतं वर्ष गेेल्या शंभर वर्षांतील सर्वाधिक उष्ण तापमानाचं वर्ष, अशा स्वरूपाच्या बातम्या आपल्याला वाचायला मिळतात. कुठल्यातरी शास्त्रज्ञांच्या गटाचं किंवा एखाद्या प्रयोगशाळेचं हे मत असतं.
खरं तर जागतिक तापमानवाढीचे दुष्परिणाम तुम्हा-आम्हाला सर्वाधिक भोगोवे लागणार आहेत. तेव्हा आपण ठरवलं तर आपणच सरकारचं डोकं ठिकाणावर आणू शकू; पण त्यासाठी आपल्याला आधी जागतिक तापमानवाढीची कारणं समजून घ्यायला हवीतच; पण माणूसच याला कसा जबाबदार आहे, तेही समजून घ्यावं लागेल. मगच आपण ही तापमानवाढ रोखण्याचे प्रयत्न करू शकू.
आपल्यापैकी बरेचजण कुठल्याना कुठल्या उद्यानात गेले असतील. बहुतेक मोठ्या वनस्पती-उद्यानांमध्ये आणि शेतकी महाविद्यालयांत, तसंच विद्यापीठांच्या वनस्पतीशास्त्र विभागांमध्ये आपल्याला हरितगृह किंवा काचेचं घर बघायला मिळतं. याचं छप्पर हिरव्या काचांचं असतं. या घरात अनेक अनोख्या वनस्पती जोमानं वाढत असतात. त्या काचगृहात सूर्यकिरण सहजपणे प्रवेश करू शकतात. त्यामुळं या काचगृहातील हवा तापते; पण या तापलेल्या हवेतील उष्णता मात्र या काचेतून बाहेर जाऊ शकत नाही. याचा फायदा घेऊन अगदी थंड प्रदेशातसुद्धा विषुववृत्तीय दुमिर्ळ वनस्पती वाढवणं सहज शक्य होतं.
या काचगृह किंवा हरितगृहाचा आणि जागतिक तापमानवाढीचा संबंध काय, असं आपल्याला वाटेल. आपण कार्बनी इंधन जाळतो. पेट्रोल, डिझेल या इंधन तेलांच्या वापरातून कार्बन मोनॉक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर पडतात. ते गरम असतात आणि हवेपेक्षा हलके असतात. त्यामुळे ते वातावरणात उंचावर जात राहतात. याचबरोबर पाण्याची वाफ, मिथेन, नायट्रस ऑक्साईड आणि सीएफसी (क्लोरोफ्लुरोकार्बन्स) वातावरणात मानवी उद्योगांचा (म्हणजे केवळ इंडस्ट्री नव्हे तर इतरही व्यवहार) परिणाम म्हणून मिसळत राहतात. यातले सीएफसी नैसगिर्करीत्या आढळत नाहीत. ते शंभर टक्के मानवनिमिर्त असतात. याचं वातावरणातलं एकूण प्रमाण अत्यल्प असतं. ते सगळे मिळून वातावरणाच्या इतर घटकांपुढं नगण्य ठरतात. त्यांची गोळाबेरीज एक टक्क्याच्या काही शतांश भाग एवढीसुद्धा नसते. पण ज्याप्रमाणे विषाचा एक थेंबदेखील प्राणघातक ठरू शकतो, त्याचप्रमाणे एकूण वातावरणाच्या एक टक्क्याच्या शतांश भागाहून कमी असलेले हे वायू पृथ्वीच्या वातावरणाचा नूर बदलून टाकतात. याचं कारण, हे वायू उष्णता शोषून ती साठवून ठेवू शकतात. दिवसा सूर्यप्रकाश पृथ्वीवर पडतो. त्यामुळे पृथ्वी तापते. प्रकाशकिरण या हरितगृहवायंूतून आरपार जाऊ शकतात. शास्त्रीय भाषेत हरितगृहवायू प्रकाशासाठी पारदर्शक ठरतात, असं म्हटलं जातं. या प्रकाशाचा परिणाम पृथ्वी तापण्यात होतो. म्हणजे प्रकाशऊजेर्चं रूपांतर उष्णतेत होतं. रात्री पृथ्वीचा हा भाग थंड व्हायला सुरुवात होते. म्हणजे ही उष्णता जमिनीतून बाहेर पडून अवकाशात परतायचा प्रयत्न करते. त्यावेळी वातावरणातील हे वायूंचे रेणू ही उष्णता साठवतात. ही उष्णता त्या रेणूंना ओलांडून अवकाश पोकळीत जाऊ शकत नाही. यामुळे अवकाशाचं सरासरी तापमान वाढतं. हे तापमान त्यांच्या आसपासच्या रेणूंनाही दिलं जातं. जेवढ्या प्रमाणात या हरितगृहवायूंचे प्रमाण वातावरणात वाढते, तेवढ्या प्रमाणामध्ये वातावरणाचे सरासरी तापमान वाढत जाते. १९व्या शतकातील औद्योगिक क्रांतीनंतर हळूहळू या वायूंचे वातावरणातील प्रमाण वाढू लागले. २०व्या शतकाच्या अखेरच्या काळात हे प्रमाण वाढणं अधिक वेगवान बनलं.
औद्योगिक क्रांती घडल्यावर फार प्राचीन काळी गाडल्या गेलेल्या जंगलांचा मानवानं इंधन म्हणून मोठ्या प्रमाणावर वापर सुरू केला. कुठलाही कार्बनी पदार्थ जाळला की त्यातून कार्बनडाय ऑक्साईडची निमिर्ती होतेच. त्याप्रमाणे लाकूड आणि दगडी कोळसा जाळल्यानंतर वातावरणात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढू लागले. दगडी कोळसा जाळला जात असताना कार्बन डायऑक्साईड वायूच वातावरणामध्ये मिसळत होता असे नाही. काही कोळशामध्ये गंधक आणि त्याची संयुगेही आढळतात. त्यांच्या ज्वलनाने सल्फर डायऑक्साईडही हवेत मिसळू लागला. हे काहीच नाही अशी परिस्थिती विसाव्या शतकात उद्भवली. याचं कारण विसाव्या शतकात कोळसा तर जाळला जातच होता; पण त्यात खनिज तेल आणि इंधन वायूंच्या ज्वलनामुळे निर्माण होणाऱ्या कार्बन डायऑक्साईडची भर पडली. जंगलं गाडली गेली, तेव्हा काही सूक्ष्म प्राणीही गाडले गेले. जेव्हा भूविवर्तनी क्रिया घडतात; म्हणजे सागरतळ वर उचलला जातो, त्याचे पर्वत बनतात किंवा हे पर्वत परत जमिनीत जातात. अशा अनेक घटना पृथ्वीवर सतत घडत असतात; म्हणून आपली पृथ्वी ही एक चल प्रणाली (डायनॅमिक सिस्टीम) मानली जाते. या घटना का व कशा घडतात, हे सांगायला गेलो तर पोथ्यांमध्ये लिहितात त्याप्रमाणे ‘ग्रंथ विस्तारेल;’ पण या घटना घडताना प्रचंड दाब निर्माण होतो, उष्णता निर्माण होते आणि खडकांना वळ्या पडतात किंवा खडक तुटतात. त्यात हे कार्बनी जीव पिळले जाऊन त्यांचं तेल निघतं. तेच नैसगिर्क खनिज तेल. हे संप्लवनशील म्हणजे झटकन वाफ होणारं असतं. जेव्हा हे जमिनीखाली अडकतं तेव्हा ते खडकातील खनिज कणांमध्ये साठतं. सर्वसाधारणपणे हे गाळांपासून बनलेल्या म्हणजे अवसादी खडकात आढळतं. यातून निघालेले वायू जर निसटायला वाव नसेल तर त्यांच्यावरच साठतात. हे पाण्यापेक्षा हलके असल्यामुळं भूजलाच्या वरती असतात. हे तेल आणि वायू आपण इतक्या मोठ्या प्रमाणावर वापरू लागलो की, वातावरणात कोळसा जाळून जमा होणाऱ्या कार्बन डायऑक्साईडमध्ये भरपूर भर पडून हरितगृह परिणाम वाढू लागला.
क्लोरोफ्लुरोकार्बन्स (सीएफसी) या कुटुंबातील वायूंचा हरितगृह परिणाम करणारे वायू म्हणून आधी उल्लेख आलेला आहे. हे वायू मानवनिमिर्त असून ते १९४०च्या सुमारास वापरात आले. हे कृत्रिम वायू आपल्या फ्रीजमध्ये, एरोसोल कॅनमधे आणि इलेक्ट्रॉनिक उद्योगात प्रामुख्यानं शीतीकरणासाठी वापरले जातात. सध्याच्या हरितगृह परिणामाच्या निमिर्तीत २५ टक्के वाटा या वायूंचा आहे. आता सीएफसी वापरावर बंदी आहे; पण त्यांनी करायचं ते नुकसान करून झालं आहेच. हे वायू पृथ्वीजवळ असताना फारसं नुकसान करीत नाहीत. ते वातावरणाच्या वरच्या थरात जातात, तेव्हा त्यांच्या विघटनातले घटक ओझोन या ऑक्सिजनच्या (O3) या रूपाचं ऑक्सिजनच्या सामान्य रूपात (O2) रूपांतर करतात. हा जो ओझोन वायूचा थर आहे, तो सूर्याकडून येणाऱ्या अल्ट्राव्हायोलेट प्रारणांपासून आपले रक्षण करतो. ही प्रारणे वातावरण तापवतातच; पण त्यांच्यामुळे त्वचेच्या कर्करोगासह इतरही व्याधींना आपल्याला सामोरे जावे लागते. तिसरा हरितगृह वायू म्हणजे मिथेन. पाणथळजागी कुजणाऱ्या वनस्पती, कुजणारे इतर कार्बनी पदार्थ यातून मिथेन बाहेर पडून हवेत मिसळतो. टुंड्रा प्रदेशात जी कायमस्वरूपी गोठलेली जमीन (पर्मा फ्रॉस्ट) आहे, त्यात पृथ्वीवरचा १४ टक्के मिथेन गाडलेल्या वनस्पतींच्या अवशेष स्वरूपात आहे. पृथ्वीचं तापमान वाढतंय तसतशी गोठणभूमी वितळू लागली असून त्या जमिनीमधून मोठ्या प्रमाणावर सुटणारा मिथेन वातावरणात मिसळू लागला आहे. सागरतळी जे कार्बनी पदार्थ साठलेले आहेत त्यांचा साठा पृथ्वीवरील दगडी कोळशांच्या सर्व साठ्यांपेक्षा काही पटीनं मोठा आहे. बरेचदा सागरी उबदार पाण्याचा प्रवाह सागरात खोलवरून जातो तेव्हा किंवा सागरतळाची भूभौतिक कारणांनी हालचाल होते तेव्हा या मिथेनचे (आणि इतर कार्बनी वायूंचे) मोठमोठे बुडबुडे एकदम सागरातून अचानकपणे वर येतात. या बृहतबुदबुदांनी (प्लूम्स) काहीवेळा सागरी अपघात घडतात. असे मिथेनचे बुडबुडे ओखोत्स्क सागरात रशियन शास्त्रज्ञांनी आणि कॅरिबियन सागरात अमेरिकन शास्त्रज्ञांनी नांेदले आहेत. हे बुडबुडे काहीवेळा एखाद्या शहराच्या लांबी-रुंदीचेदेखील असू शकतात. सागरपृष्ठावर येईपर्यंत ते मोठे होत होत फुटतात. त्यामुळं सागरात अचानक खळबळ माजते.
नायट्रस ऑक्साइड या हरितगृहवायूबद्दल शास्त्रज्ञांना विशेष माहिती नाही. नैसगिर्करित्या हा वायू कसा तयार होतो, हे एक कोडंच आहे. चमकणाऱ्या विजांमुळं तो निर्माण होतो, हे एक कारण अंदाजे माहीत आहे. तसंच नायलॉननिमिर्तीत वातावरणातील एकूण नायट्रस ऑक्साइडच्या दहा टक्के नायट्रस ऑक्साइड तयार होतो, असं दिसतं. यापलीकडं हा वायू कुठे निर्माण होतो, तो वातावरणात कसा मिसळतो, याबद्दल फारसं माहीत नाही; पण त्याचं वातावरणातलं प्रमाण वाढतंय हे नक्की. tmp 24664