राज्यघटनेवर आधारित काही महत्वाचे प्रश्नोत्तरे (भाग -1)

Q. भारताने राज्यघटना स्वीकार…….रोजी केली ?

✔ २६ नोव्हेंबर १९४९.
Indian%2Bconstitution%2Bimp%2Bquistions%2Bin%2BMarathi
Q. भारतीय राज्य-घटना कधी अमलात आली ?
✔ २६ जानेवारी १९५०.
Q. घटना समितीचे अध्यक्ष कोण होते ?
✔ डॉ.राजेंद्रप्रसाद.
Q. भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी…….घटना आहे ?
✔ लिखित.
Q. भारतीय राज्यघटना तयार करण्यास किती कालावधी लागला ?
✔ ०२ वर्षे ११ महीने १८ दिवस.
Q. भारतीय संविधान हे……. आहे.
✔ अंशता संघात्मक व अंशता एकात्मक.
Q. भारतात नागरिकत्व कोणत्या पद्धतीचे आहे ?
✔ एकेरी.
Q. भारताने संसदीय शासन पद्धती कोणत्या देशातून स्वीकारली आहे ?
✔ इंग्लंड.
Q. संघराज्य पद्धत कोणत्या देशातून स्वीकारली आहे ?
✔ अमेरिका.
Q. मूळ भारतीय घटनेत मूळ किती मूलभूत अधिकार होते ?
✔ ०७.
Q. ४४व्या घटनादरूुस्ती नुसार…….हा मूलभूत अधिकार रद्द झाला ?
✔ संपत्तीचा.
Q. ४२व्या घटना दरुस्तीत कोणते शब्द उद्देशपत्रिकेत जोडले गेले ?
✔ समाजवादी, धर्मनिरपेक्ष, अखंडता.
Q. मूलभूत अधिकारांशी संबंंधीत कलमे कोणती ?
✔ कलम १२ ते ३५.
Q. संसदेशी समंधित कलम कोणते ?
✔ कलम ७९ ते १२२.
Q. राज्यसभेत सर्वात जास्त प्रतींनिधी कोणत्या राज्यांचे असतात ?
✔ उत्तर प्रदेश.
Q. घटने नुसार राज्यसभेची कमाल सदस्य संख्या किती ?
✔ २५०.
Q. संसदेच्या दोन अधिवेशना मधील कालावधी जास्तीत जास्त……..एवढा असावा ?
✔ सहा महिने.
Q. राज्य मंत्रिमंडळ संयुक्तपणे कोणाला जबाबदार असते ?
✔ विधानसभा.
Q. संसदेच्या दोन्ही सभागहृाचे निर्वाचित सदस्य कोणाची निवड करतात ?
✔ उपराष्ट्रपती.
Q. राज्याच्या आर्थिक व्यवहारावर पुर्ण नियंत्रण कोणाचे असते ?
✔ विधिमंडळाचे.
Q. महाराष्ट्राच्या विधान सभेत निर्वाचित सभासदाची संख्या किती असते ?
✔ २८८.
Q. मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण हे राज्याचे…….कार्य होत ?
✔ कल्याणकारी.
Q. —–हा राज्याचा नामधारी प्रमुख असतो ?
✔ राज्यपाल.
Q. शेती  हा विषय कोणत्या सूचित देण्यात आला आहे ?
✔ राज्यसूची.
Q. विधान परिषदेच्या सदस्याचा कार्यकाळ किती असतो ?
✔ ०६ वर्षे.
Q. लोकसभा हे कोणते सभागृह आहे ?
✔ अस्थायी.
Q. एखादे विधेयक हे धन विधेयक आहे की नाही हे ठरवण्याचे अधिकार कोणाचा असतो ?
✔ लोकसभा अध्यक्ष.
Q. संकटकालीन काळात लोकसभा किती ने वाढवण्यात येते ?
✔ ०१ वर्षानी.
Q. संघसूचित किती विषयाचा समावेश आहे ?
✔ ९७.
Q. राज्यसूचित किती विषयाचा समावेश आहे ?
✔ ६६.
Q. संमवर्ती सूचित किती विषय आहे ?
✔ ४७.
Q. संमवती सूचित विषय वर कायदा कोण बनवू शकते ?
✔ केंद्र व राज्य सरकार.
Q. लोकसभेचे मुदतपूर्व विर्सजन करण्याचा अधिकार कोणास आहे ?
✔ राष्ट्रपती.
Q. राष्ट्रपति कोणत्या कलम ने  संपूर्ण देशात आणीबाणी लावू शकतात ?
✔ ३५२.
Q. आतापर्यत भारतात किती वेळा राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यात आली ?
✔ ०३ वेळा.
Q. दुहेरी शासन व्यवस्था असलेल्या पद्धतीला काय म्हणतात ?
✔ संघराज्य.
Q. स्वातंत्राच्या हक्काचा समावेश भारतीय राज्य घटनेच्या —– या
कलमात करण्यात आला आहे ?
✔ कलम १९ ते २२.
Q. भारतीय संसदेतील सर्वात मोठी समिती कोणती ?
✔ अंदाज समिती.
Q. ४२ वी घटना दुरुस्ती खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत कार्यात आली  होती ?
✔ १९७६.
Q. जास्तीत जास्त किती दिवस अर्थ विधेयक राज्यसभा स्वत: कडे ठेवू शकते ?
✔ १४ दिवस.
Q. घटना परिषदेची निर्मिती—- मध्ये कॅबिनेट मिशन च्या शिफारशी नुसार झाली ?
✔ २४ मार्च १९४६.
Q. भारतात घटनात्मक रित्या किती भाषाना मान्यता देण्यात आली ?
✔ २२.
Q. पहिल्या सार्वत्रिक निवडणुका कधी घेण्यात आल्या होत्या ?
✔ १९५२.
Q. वटहुकुम राष्ट्रपती कोणत्या कलम ने काढतात?
✔ १२३.
Q. घटना समितेचा पहिले अधिवेशन केव्हा झाले ?
✔ ०९ डिसेंबर १९४६.